१८५७ च्या उठावाच्या अपयशाची कारणे |
१८५७ च्या उठावाच्या अपयशाची कारणे
- उठावादरम्यान क्रांतिकारकांमधील एकसुत्रतेचा व एककेंद्री नेतृत्त्वाचा अभाव.
- उठावकऱ्यांजवळ पुरेशी शस्त्रास्त्रे नव्हती. सुशिक्षित भारतीय व बहुसंख्य राजेरजवाडे उठावापासून अलिप्त राहिले. केवळ उत्तर भारतातच उठावाचे लोण पसरले.
- दक्षिण भारत उठावाच्या प्रभावापासून बऱ्यापैकी वंचित राहिला.
- इंग्रजांकडील एककेंद्री नेतृत्त्व, अद्ययावत शस्त्रास्त्रे, कुशल सेनानी, दळणवळणाचा ताबा या बाबींमुळे त्यांना उठाव मोडून काढणे शक्य झाले.
- ३१ मे १८५७ या पूर्वनियोजित तारखेपूर्वीच उठावास सुरूवात झाली.
१८५७ च्या उठावाचे परिणाम
१) १८५८ च्या राणीच्या जाहीरनाम्यानुसार कंपनी राजवटीची भारतातील अखेर : १ नोव्हेंबर १८५८ : अलाहाबाद दरबारात लॉर्ड कॅनिंग याने राणी व्हिक्टोरियाचा जाहीरनामा घोषित केला. त्यानुसार भारतातील कंपनीची राजवट बरखास्त करून भारतातील कारभार राणीच्या वतीने पाहिला जाईल असे घोषित केले.
या जाहिरनाम्यानुसार :
अ) वंश, धर्म, जात, जन्मस्थान यांवरून भारतीयांत भेदभाव न करता शासकीय नोकऱ्या देताना 'गुणवत्ता' हाच निकष राहिल असे राणीने जाहिर केले.
ब) पूर्वीची ‘बोर्ड ऑफ कंट्रोल' आणि 'बोर्ड ऑफ डायरेक्टर्स' ही मंडळे बरखास्त करून त्यांच्या जागी 'भारतमंत्री आणि त्याचे मंत्रीमंडळ' यांची निर्मिती करण्यात आली.
क) लॉर्ड कॅनिंग हा भारताचा पहिला व्हाईसरॉय तर लॉर्ड स्टॅनले हा पहिला भारतमंत्री बनला. ४. भारतातील कोणतेही संस्थान यापुढे खालसा केले जाणार नाही अशी हमी देण्यात आली.
२) ब्रिटिश लष्कराची पुनर्रचना : भारतातील ब्रिटिश लष्कराची पुनर्रचना करताना युरोपियनांची संख्या वाढवण्यात येऊन मोक्याच्या ठिकाणी इंग्रज सेनानींच्या नेमणूका करण्यात आल्या.
३) विविध सामाजिक सुधारणांमुळे पारंपरिक भारतीय समाजात असंतोष निर्माण झाल्याने इंग्रजांनी सामाजिक सुधारणांचे आपले धोरण बदलले.
४) सत्ता बळकटीसाठी इंग्रजांनी भारतात भेदनीतिचा अवलंब केला, पर्यायाने इंग्रजी राजवटीबद्दल भारतीयांत दहशत व तिरस्कार वाढीस लागला.
५) 'फोडा व राज्य करा' या इंग्रजांच्या नीतिमुळे हिंदू-मुस्लीमांतील दरी वाढू लागली.
६) उठावातील अपयशानंतर संस्थानिक, जमीनदार हे पारंपरिक नेतृत्त्व मागे पडून पाश्चात्य शिक्षणाचा पगडा पडलेल्या विचारवंतांच्या नव्या सनदशीर राजकारणास प्रारंभ झाला.
७) उठावाचा बीमोड करताना इंग्रजांनी दाखविलेल्या सूडबुध्दिमुळे इंग्रजांविरूध्द असंतोष वाढून भारतीय राष्ट्रवादाला उत्तेजन मिळाले.
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
0 Comments