1857 च्या उठावाची कारणे संपूर्ण माहिती स्पर्धापरीक्षा उपयुक्त १००% येणार 1857 revolt in marathi

 १८५७ च्या उठावाची कारणे 

१८५७ च्या उठावाची कारणे
१८५७ च्या उठावाची कारणे


अ) राजकीय कारणे :

१) वेलस्लीच्या तैनाती फौजेचे दुष्परिणाम : तैनाजी फौजेच्या पध्दतीमध्ये इंग्रज फौजेचा सर्व खर्च ती ज्याच्या पदरी असेल त्या राजाने करायचा व त्या फौजेवर हुकुमत गाजवायची ती मात्र इंग्रजांनी, वेलस्लीच्या डावपेचांमुळे तैनाजी फौजेच्या प्रभावाखालील राज्ये दुबळी बनली व त्यांच्यात असंतोष निर्माण झाला. 

२) डलहौसीचे आक्रमक विस्तारवादी धोरण : प्रशासकीय सोयीसाठी भारतातील सर्व भूप्रदेश एकछत्री अंमलाखाली आणण्याच्या हेतूने लॉर्ड डलहौसीने १८४८ ते १८५६ या काळात भारतातील अनेक संस्थाने 'दत्तक वारस नामंजूर' (व्यपगत सिद्धांत) तत्त्वानुसार तसेच प्रशासनात अकार्यक्षमता या कारणावरून खालसा केली. राजेरजवाड्यांच्या पदव्या व तनखे बंद करून टाकले. यामुळे बिटिशांविरूध्द असंतोष धुमसत राहिला. 

ब) सामाजिक कारणे : 

१) केवळ स्वत:ची संस्कृती श्रेष्ठ मानताना इंग्रजांनी भारतीय संस्कृतीला रानटी संस्कृती व भारतीय लोकांना रानटी असे संबोधले.

२) हिंदू संस्कृतीवर संकट आल्याची भावना : सतिबंदी कायदा, बालविवाहप्रतिबंधक कायदा, विधवा-पुनर्विवाह कायदा यासारखे काही अन्यायनिवारण कायदे ब्रिटिशांनी भारतात राबवले. परंपरागत भारतीय समाजाला हे आपल्या संस्कृतीवरील आक्रमण वाटले. 

क) धार्मिक कारणे :

१) तिसरे संकट धर्मावर : १८१३ च्या कायद्याने इंग्लंडमधील कोणत्याही व्यक्तीला धर्मप्रसारासाठी भारतात जाण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले. पर्यायाने, इंग्रजी आक्रमणाने भारतीयांची प्रथम सत्ता गेली, नंतर व्यापारउमीद बुडाला आणि आता धर्मावर तिसरे संकट आल्याची भावना वाढीस लागली.

) समाजसुधारणावादी धोरणाविषयी प्रतिकूल प्रतिक्रिया : सतीबंदी, विधवा-पुनर्विवाह, बालविवाहबंदी यासारख्या सामाजिक सुधारणा म्हणजे भारतीय संस्कृती व धर्म नष्ट करण्याचा डाव आहे अशी भावना वाढीस लागली. लष्कराच्या मद्रास छावणीतील शिपायांना गंध लावण्यास व दाढी वाढवण्यास बंदी घालण्यात आली (१८०६). १८४२ साली ब्रह्मदेशच्या युध्दात हिंदू शिपायांना सक्तीने पाठविण्यात आले. परदेशगमन, समुद्रपर्यटन या गोष्टी त्याज्य मानणाऱ्या हिंदी शिपायांत यामुळे असंतोष वाढू लागला. 

ड) आर्थिक कारणे :

१) हस्तव्यवसायांचा हास : भारतातील कच्च्या मालावर आधारित इंग्लंडमधील यंत्रावरील तयार माल भारतात उपलब्ध झाल्याने येथील पारंपरिक हस्तव्यवसायांचा हास होऊन कारागीर पुरते बुडाले.

२) शेतकरी-जमीनदार या वर्गात रयतवारी, महालवारी, कायमधारा आदी सदोष महसुलपध्दतींमुळे असंतोष पसरला. 

इ) लष्करी कारणे : 

१) हिंदी शिपायांना ब्रिटिश सैन्याच्या तुलनेत मिळणारी अन्यायी वागणूक, हिंदी शिपायांवरील लष्करातील शिस्तीसंबंधीचे जाचक नियम इत्यादी कारणांमुळे सैनिकांत असंतोष होता. 

२) तात्कालिक कारण : सैनिकांना बंदुकीची काडतुसे वापरताना या काडतुसांची आवरणे दातांनी तोडावी लागत. या काडतुसांना गाईची व डुकरांची चरबी लावलेली असते अशी बातमी लष्करात पसरताच हिंदू-मुस्लीम सैनिकांच्या धर्मभावना दुखावल्या आणि ते बंड करून उठले. अशापकारे वर्षांनुवर्षे दाटलेल्या असंतोषाचा उद्रेक १८५७ च्या उठावाने झाला. १८५७ च्या उठावाचे लोण उत्तर भारतात सर्वाधिक पसरले. त्यामानाने दक्षिण भारत उठावापासून बऱ्यापैकी वंचित राहिला.   

१८५७ चा उठाव याविषयात अधिक माहितीसाठी तसेच १८५७ चा उठावाच्या अपयशाची कारणे व १८५७ चा उठावाचे परिणाम या बद्दल माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. 

१८५७ चा उठाव | १८५७ च्या उठावाच्या अपयशाची कारणे | १८५७ च्या उठावाचे परिणाम 

Post a Comment

0 Comments