कोणत्या प्रदेशात पावसाचे प्रमाण जास्त आहे | भारताचे हवामान | भारताचे ऋतू | भारताचा उन्हाळा पावसाळा हिवाळा

भारताचे हवामान

भारताचे हवामान
भारताचे हवामान


  • भारताचे हवामान हा हिमालय पर्वत प्रदेशाचा परिणाम असून हवामानदृष्ट्या भारताचे स्थान उष्ण कटिबंधात आहे.
  • भारताचे हवामान 'मान्सून' (मोसमी) प्रकारात मोडते. भारताचे एकूण ३६ हवामान विभागांत वर्गीकरण. 
  • तापमान वितरण : देशाच्या मध्यातून गेलेल्या कर्कवृत्तावर जवळजवळ वर्षभर सूर्यकिरणे लंबरूप पडतात, त्यामुळे तेथे वर्षभर तापमान अधिक असते. सरासरी वार्षिक तापमान कक्षा दक्षिणेकडे वाढत जाते. 
  • उन्हाळ्यात राजस्थानमधील गंगानगर भागात (५०° सें.ग्रे.हून अधिक) देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद होते. 
  • हिवाळ्यात जम्मू-काश्मीर, हिमालयीन पर्वत क्षेत्र येथील तापमान उणे (-) ४०° सें.ग्रे. इतके खाली उतरते. 

ऋतू : भारतात ऋतूंची विभागणी पुढीलप्रमाणे केलेली आढळते. 

अ) उष्ण हवेचा उन्हाळा : मार्च ते मे.

ब) दमट व उष्ण पावसाळी ऋतू : जून ते सप्टेंबर 

क) माघारी मान्सूनचा काळ : ऑक्टोबर ते नोव्हेंबर

ड) थंड व कोरडा हिवाळा : डिसेंबर ते फेब्रुवारी 

अ) उन्हाळा (मार्च ते मे) : 

  • २१ मार्च रोजी सूर्यकिरणे विषुववृत्तावर लंबरूप पडतात. या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते.
  • भारतात या काळात सूर्यकिरणे लंबरूप पडून तापमान वाढते व उन्हाळा सुरू होतो. 
  • परिणाम : लू, धुळीची वादळे, नार्वेस्टर, कालबैसाखी. 
  • लू : मे-जून महिन्यात उत्तरेकडील पश्चिम मैदानी प्रदेशात वाहणारे अतिउष्ण व कोरडे वारे. 
  • नार्वेस्टर : पश्चिम बंगाल, ओडिशा या भागात बंगालच्या उपसागरावरून येणारे उबदार बाष्पयुक्त वारे व वायव्येकडून येणारे उष्ण कोरडे वारे यांच्या संम्मीलनात गडगडाटी वादळांची निर्मिती होते. त्यास 'नार्वेस्टर' म्हणतात.
  • कालबैसाखी : गंगेच्या मैदानात पश्चिम बंगालमध्ये मार्च महिन्यात मोसमीपूर्व वाहणाऱ्या उष्ण वादळी हवेच्या प्रवाहांना 'कालबैसाखी' म्हणतात. यामुळे धुवांधार पर्जन्यवृष्टी होते.
  • आंबेसरी : उन्हाळ्यातील कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू या राज्यांत पडणारा पाऊस. 
  • वसंत वर्षा : पश्चिम बंगाल, आसाममध्ये या पावसास वसंत वर्षा म्हणतात. 
  • ब्लॉसम शॉवर्स (फुलांचा वर्षाव) : मे महिन्याच्या शेवटी व जूनच्या प्रारंभी केरळ व कर्नाटक राज्यांत पडणारा वादळी पाऊस. हा कॉफी पिकासाठी उपयुक्त असल्याने त्यास 'कॉफी बहार सरी' असेही म्हणतात. महाराष्ट्रात या पावसास 'आम्रसरी' किंवा वळिवाचा पाऊस म्हणतात. 

ब) पावसाळा (जून ते सप्टेंबर) : 

  • हिंदी महासागरावरून वाहणाऱ्या बाष्पयुक्त नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे भारतात नियमित पाऊस पडतो.
  • भारतात प्रवेश करताना नैऋत्य मोसमी वाऱ्यांचे ‘अरबी समुद्रावरून वाहणारे' व 'बंगालच्या उपसागरावरून वाहणारे' असे दोन प्रकार पडतात, हे वारे भारतात ८० टक्के हून अधिक पाऊस देतात. 
  • गंगेच्या मैदानी प्रदेशात ९० टक्के पाऊस बंगालच्या उपसागरावरून वाहणाऱ्या मोसमी वाऱ्यांच्या शाखेमुळे पडतो. 

क) माघारी मान्सूनचा काळ (ऑक्टोबर ते नोव्हेंबर) : 

  • २३ सप्टेंबरपासून सूर्याचे दक्षिणायन सुरू होते आणि उत्तर गोलार्धात तापमान कमी होऊन वायूदाब वाढतो, परिणामी उत्तर भारतात नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा प्रभाव कमी होऊन ते आग्नेय व दक्षिणेकडे सरकू लागतात. यालाच मान्सूनची माघार असे म्हणतात. 
  • ऑक्टोबर उष्मा (October Heat) : सप्टेंबरच्या मध्यापर्यंत भारतात वाहणारे नैऋत्य मोसमी वारे माघारी फिरल्यानंतर भारतात ऑक्टोबर महिन्यात सूर्यप्रकाशाची तीव्रता वाढून तापमानही वाढते. यास ‘संक्रमण काळ' असे म्हणतात. 

ड) हिवाळा : 

  • २२ डिसेंबरला सूर्य मकरवृत्तावर असतो, त्यावेळी भारतात तापमान कक्षा खाली येऊन कोरडा व थंड हिवाळा सुरू होतो. या काळात 'ईशान्य मोसमी वारे' (समुद्राकडे वाहणारे) बंगालच्या उपसागरावरून बाष्पयुक्त बनतात.
  • ईशान्य मोसमी वाऱ्यांमुळे तामिळनाडूच्या मध्य व पूर्व भागात आणि आंध्र प्रदेशात हिवाळ्यात पाऊस पडतो. 
  • जेट वाऱ्यांचा प्रभाव : हिवाळ्यात जम्मू काश्मिर व हिमाचल प्रदेश या राज्यांत तपांबराच्या वरच्या थरात
  • २०,००० ते ५०,००० फूट (सुमारे ११ किमी) उंचीवरून पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणाऱ्या जेट वाऱ्यांमुळे पाऊस पडतो व हिमवृष्टी होते.



Post a Comment

0 Comments