१९०५ नंतरचे भारतातील प्रमुख व्हाईसरॉय व त्यांची कारकीर्द | लॉर्ड मिंटो | लॉर्ड हार्डिंग्ज दुसरा | लॉर्ड चेम्सफोर्ड | लॉर्ड रिडींग | लॉर्ड आयर्विन | लॉर्ड माऊंटनबॅटन

 १९०५ नंतरचे भारतातील प्रमुख व्हाईसरॉय व त्यांची कारकीर्द 

भारतातील प्रमुख व्हाईसरॉय
भारतातील प्रमुख व्हाईसरॉय


लॉर्ड मिंटो (१९०५ - १९१०): 

  • १९०६ : मुस्लीम लीगची स्थापना. 
  • १९०९ : मोर्ले-मिंटो सुधारणा कायदा 

लॉर्ड हार्डिंग्ज दुसरा (१९१०-१९१६) :  

  • १९११ : भारताची राजधानी कोलकाताहून दिल्लीला हलविली. 
  • १९११ : ब्रिटीश सम्राट पंचम जॉर्ज यांची भारत भेट : दिल्ली दरबार. याच दिल्ली दरबारात पंचम जॉर्ज यांनी बंगालची फाळणी रद्द झाल्याची घोषणा केली. 

लॉर्ड चेम्सफोर्ड (१९१६-१९२१) : 

  • १९१९ : रौलेट कायदा संमत. 
  • १३ एप्रिल १९१९ : रौलेट कायद्याच्या निषेधार्थ अमृतसरमधील जालियनवाला बागेत भरलेल्या सभेवर
  • डायरचा गोळीबाराचा आदेश (जालियनवाला बाग हत्याकांड) 
  • १९१९ : माँटेग्यू-चेम्सफोर्ड सुधारणा कायदा संमतः 
  • १९२० : गांधीजींची असहकार चळवळ. 

लॉर्ड रिडींग (१९२१-१९२६) : 

  • ५ फेब्रुवारी १९२२ : चौरी-चौरा हत्याकांडामुळे गांधीजींची असहकार चळवळ स्थगित. 
  • प्रिन्स ऑफ वेल्सची.भारत भेट . १९२३ : स्वराज्य पक्षाची स्थापना. 
  • १९२५ : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना (नागपूर) 

लॉर्ड आयर्विन (१९२६-१९३१): 

  • १९२७ : सायमन कमिशनची स्थापना.
  • १९२८ : सायमन कमिशनच्या निषेधार्थ काढलेल्या मोर्ध्यात लाहोर येथे लाला लजपतराय यांचा लाठीहल्ल्यात मृत्यू. 
  • ऑगस्ट १९२८ : नेहरू रिपोर्ट (पंडित मोतीलाल नेहरू)
  • १९२८ : नेहरू रिपोर्टच्या विरोधात बॅ. जिनांचे प्रसिध्द १४ मुद्दे. 
  • १९२९ : संपूर्ण स्वराज्याची मागणी. 
  • १९३० : लंडन येथे पहिली गोलमेज परिषद.
  • ५ मार्च १९३१ : गांधी-आयर्विन करार. 

लॉर्ड विलिंग्डन (१९३१-१९३६) : 

  • १९३१ ची दुसरी व १९३२ ची तिसरी गोलमेज परिषद (लंडन). 
  • १६ ऑगस्ट १९३२ : रॅम्से मॅक्डोनाल्डचा जातीय निवाडा; त्यानुसार अस्पृश्यांसाठी वेगळ्या मतदार संघांची घोषणा. 
  • १९३२ : महात्मा गांधींचे येरवडा कारागृहात उपोषण सुरू.
  • २४ सप्टेंबर १९३२ : गांधी-आंबेडकर यांच्यात पुणे करार/ऐक्य करार (या करारावर गांधींच्या वतीने पं. मदनमोहन मालविय यांनी सही केली.) 
  • १९३५ : भारत सरकारचा १९३५ चा सुधारणा कायदा संमत. 
  • १९३५ : ब्रह्मदेश भारतापासन वेगळा

लॉर्ड लिनलिथगो (१९३६-१९४४):

  • १९३७ : भारतात प्रांतिक निवडणुका; ८ प्रांतांत काँग्रेसची सरकारे. 
  • १ सप्टे. १९३९ : दुसऱ्या महायुध्दाची सुरूवात
  • ऑक्टो. १९३९ : प्रांतिक मंत्रीमंडळांचे राजीनामे. 
  • ८ ऑगस्ट १९४२ : 'चले जाव' ठराव संमत. 

लॉर्ड वेव्हेल (१९४४ ते मार्च १९४७):

  • १९४५ : सिमला परिषदेत वेव्हेल योजना मांडली. भारतीयांनी ती नाकारली. 
  • १९४५ : इंग्लंडमध्ये मजूर पक्ष सत्तेवर लॉर्ड ॲटली पंतप्रधानपदी. १९४६ : त्रिमंत्री योजना (कॅबिनेट मिशन). 
  • २ सप्टें. १९४६ : पं. नेहरूंच्या अध्यक्षतेखाली हंगामी सरकारची स्थापना. 
  • ९ डिसेंबर १९४६ : घटना परिषदेचे पहिले अधिवेशन दिल्लीत सुरू. 

लॉर्ड माऊंटनबॅटन (१९४७ : स्वातंत्र्यपूर्व कारकीर्द): 

  • ३ जून १९४७ : माऊंटबॅटन योजना घोषित; त्यानुसार भारत आणि पाकिस्तान ही दोन नवीन राष्ट्र निर्माण. 
  • १८ जुलै १९४७ : भारतीय स्वातंत्र्याचा कायदा संमत. 
  • १५ ऑगस्ट १९४७ : सुमारे दीडशे वर्षांच्या गुलामीच्या शृंखलांतून भारत स्वतंत्र. 
  • लॉर्ड माऊंटबॅटन हे ब्रिटीशकालीन भारताचे शेवटचे व्हॉईसराय तर स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल ठरले.

Post a Comment

0 Comments