महाराष्ट्रातील समाजसुधारक व धार्मिक सुधारणा चळवळी
गोपाळ हरी देशमुख |
गोपाळ हरी देशमुख (लोकहितवादी)
- महाराष्ट्रातील धर्मप्रबोधनाच्या चळवळीतील अग्रणी.
जन्म : १८ फेब्रुवारी १८२३, पुणे येथे.
उपनाव : सिद्धेय
- १८४४ मध्ये सरकारी खात्यात दुभाषाचे कार्य, १८४६ मध्ये शिरस्तेदार.
- १८५२ मध्ये वाई येथे 'मुन्सफ'; १८५६ मध्ये इनाम कमिशनवर कमिशनर.
- १८६२ मध्ये अहमदाबाद येथे असिस्टंट जज तर अहमदनगर येथे जज्ज.
- नाशिक येथे जॉईंट सेशन जज्ज.
- ब्रिटिश सरकारने त्यांना 'जस्टिस ऑफ पीस' व 'रावबहादूर' या पदव्या दिल्या.
- १८८० मध्ये मुंबई विधीमंडळाचे सदस्य. काही काळ रतलाम संस्थानाचे दिवाण.
- १८४८ मध्ये लोकहितवादी यांनी भाऊ महाजन यांच्या 'प्रभाकर' या साप्ताहिकात ‘शतपत्रे' लिहिली. शतपत्रांमधून
- राजकीय, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक या विविध विषयांवर समाजास पत्रे लिहिली. लोकहितवादी हे स्त्री-शिक्षणाचे पुरस्कर्ते होते. लोकहितवादींनी अंधश्रद्धा, बालविवाह, हुंडा, बहुपत्नीत्व या अनिष्ट प्रथांवर कडाडून टीका केली. समाजजीवनाच्या विविध क्षेत्रांत सुधारणेचा आग्रह धरल्यामुळे त्यांना ‘सर्वांगीण सुधारणेचे आद्यप्रवर्तक' म्हटले जाते.
- भारतातील जातीव्यवस्थेवर त्यांनी कडाडून टीका केली. 'ज्ञान हीच शक्ती, शहाणपणाचे अंती सर्व आहे' या शब्दात त्यांनी शिक्षणविषयक विचार मांडले. भारतीयांनी विलायतेत शिष्टमंडळ पाठवावे व भारतासाठी पार्लमेंट मागून घ्यावे' असे लोकहितवादींनी सुचविले. लोकहिताचा सतत विचार करत असल्यामुळेच गोपाळ हरी देशमुख यांना 'लोकहितवादी' असे संबोधले जाते.
लोकहितवादींचे वाङमयीन कार्य : लोकहितवादींनी विविध विषयांवर सुमारे ३६ ग्रंथ लिहिले.
- लक्ष्मीज्ञान, हिंदस्थानास दारिद्र्य येण्याची कारणे, ग्रामरचना, स्थानिक स्वराज्य संस्था हे राजकीय व आर्थिक ग्रंथ.
- हिंदूस्थानचा इतिहास, लंका, पानिपत, गुजरात हे ऐतिहासिक ग्रंथ.
- पृथ्वीराज चौहान, स्वामी दयानद सरस्वती हे चरित्रात्मक ग्रंथ.
- 'लोकहितवादी' हे मासिक.
निधन : ९ ऑक्टोबर १८९२.
0 Comments