महाराष्ट्र : ऊर्जानिर्मिती
दगडी कोळसा, जलविद्युत, औष्णिक विद्युत, अणुविद्युत, तेल व नैसर्गिक वायू ही राज्यातील प्रमुख ऊर्जासंसाधने आहेत.
जायकवाडी धरण |
महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्प
जलविद्युत प्रकल्प |
जिल्हा |
कोयना (१९५६ मे.वॅ.), धोम |
सातारा |
राधानगरी |
कोल्हापूर |
पवना |
पुणे |
वैतरणा |
नाशिक |
भिरा अवजल प्रवाह |
रायगड |
जायकवाडी |
औरंगाबाद |
भिवपुरी |
रायगड |
येलदरी |
हिंगोली |
पेंच |
नागपूर |
खोपोली |
रायगड |
भातसा |
ठाणे |
जिगाव |
बुलढाणा |
गोसीखुर्द |
भंडारा |
घाटघर |
अहमदनगर |
नाशिक शहरास पाणीपुरवठा : गंगापूर धरण (गोदावरी)
भीरा-अवजल प्रकल्पास पाणीपुरवठा : मुळशी धरण (पुणे)
जायकवाडी धरण प्रकल्पास 'जपान' या देशाचे सहकार्य लाभले आहे.
बाभळी बंधारा : गोदावरी नदीवरील बाभळी (जि. नांदेड) बंधाऱ्यातील पाणी वापरावरून महाराष्ट्र व तेलगणा या राज्यात वाद.
जिगाव सिंचन प्रकल्प : बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठा सिंचन प्रकल्प. २००८ मध्ये बांधकाम सुरू. अद्याप अपूर्ण.
गोसीखुर्द प्रकल्प (इंदिरासागर जलाशय) : राष्ट्रीय सिंचन प्रकल्प. भंडारा जिल्ह्यात वैनगंगा नदीवर. २२ एप्रिल १९८८ ला सुरुवात. अद्याप अपूर्ण. मेंढेगिरी समिती, वडनेरे समिती यांची प्रकल्पाच्या निकृष्ट कामावर टीका.
इंडिया बुल्स : अमरावती जिल्ह्यातील खासगी वीजनिर्मिती प्रकल्प. या प्रकल्पास पाणीपुरवठ्यावरून वाद.
कोयना लेक टॅपिंग-२ यशस्वी : २५ एप्रिल २०१२ रोजी सातारा जिल्ह्यातील कोयना प्रकल्पातील शिवसागर जलाशयात लेक टॅपिंगचा दुसरा टप्पा यशस्वीपणे पार पडला. लेक टॅपिंगचे मुख्य अभियंता : दीपक मोडक .
१३ मार्च १९९९ : कोयना धरणात लेक टॅपिंगचा पहिला टप्पा यशस्वी. लेक टॅपिंग हे नॉर्वेजियन तंत्रज्ञान आहे.
ऑगस्ट २०१४ मध्ये ठाणे जिल्ह्यातील मोडकसागर धरणात (वैतरणा नदी) लेक टॅपिंगचा प्रयोग यशस्वी झाला.
वीज वितरण धोरण : ज्या घटकराज्यांत वीजनिर्मिती केंद्र आहे, त्या राज्याला तेथील एकूण वीजनिर्मितीपैकी १२ टक्के वीज विनामूल्य दिली जाते. आधुनिक काळात वीजनिर्मिती केंद्रापासून गळती न होता सुमारे ८०० किमी अंतरापर्यंत वीजेचे वहन सहज शक्य होते. त्यापेक्षा अधिक अंतरावर वीज वाहून नेताना वीजगळती होते.
महाराष्ट्रातील वीजेचा वापर (उतरता क्रम) : १) औद्योगिक क्षेत्र (सर्वाधिक), २) कृषी वापर, ३) घरगुती वापर, ४) वाणिज्यिक वापर, ५) सार्वजनिक सेवा, ६) रेल्वे
महाराष्ट्रात एकूण वीजनिर्मितीपैकी ५२% वीज विदर्भात निर्माण होते.
महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्प
औ. वि. प्रकल्प |
क्षमता (Mw) |
जिल्हा |
खापरखेडा |
१३४० |
नागपूर |
तुर्भे |
मुंबई उपनगर |
|
कोराडी |
६२० |
नागपूर |
चंद्रपूर |
२३४० |
चंद्रपूर |
बल्लारपूर |
चंद्रपूर |
|
परळी वैजनाथ |
११३० |
बीड |
पारस |
५०० |
अकोला |
चोला |
कल्याण (ठाणे) |
|
पोकरी/फेकरी |
१४२० |
भुसावळ
(जळगाव) |
धोपावे |
रत्नागिरी |
|
मौदा |
१३२० |
नागपूर |
एकलहरे |
६३० |
नाशिक |
चंद्रपूर औष्णिक विद्युत प्रकल्प :
भारतातील सर्वात मोठा औष्णिक विद्युत प्रकल्प. दर्गापूर व पद्मपूर येथील खाणीतून कोळसा पुरवठा. महाराष्ट्राची २५% वीजेची गरज भागवितो . इरई व चारगाव धरणातून पाणीपुरवठा. स्थापित क्षमता : ३३४० MW, प्रत्यक्ष उत्पादन : २३४० MW
महाजनको लिमिटेड (महानिर्मिती) :
स्थापना : ६ जून २००५, मुख्यालय : वांद्रे (मुंबई). NTPC नंतर भारतातील दुसऱ्या क्रमांकाची वीजनिर्मिती कंपनी. वीजनिर्मिती क्षमता : ११,२३७ MW. ही कंपनी महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत, जलविद्युत प्रकल्प तसेच उरण प्रकल्पाचे नियमन करते.
0 Comments