महाराष्ट्र : हवामान | महाराष्ट्रातील पर्जन्य

 महाराष्ट्र : हवामान 

महाराष्ट्र हवामान
महाराष्ट्र हवामान


महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेमुळे येथील हवामानात वैविध्य आढळते. 

पश्चिमेकडील अरबी समुद्रावरून येणारे नैऋत्य मान्सून वारे सह्याद्रीमुळे अडविले जाऊन प्रतिरोध पाऊस पडतो.

प्राकृतिक विभाग

हवामानाची विविधता

कोकण

उष्ण, सम दमट हवामान

सह्याद्री (.घाट)

थंड आर्द्र हवामान

महाराष्ट्र पठार

उष्ण, कोरडे विषम हवामान

१) उन्हाळा : मार्च ते मे  राज्यातील प्रमुख ऋतू :

२) पावसाळा : जून ते सप्टेंबर 

३) हिवाळा : ऑक्टोबर ते फेब्रुवारी

हवामान विभाग : 

डॉ. ग्लेन थॉमस त्रिवार्था या अमेरिकन भूगर्भतज्ञाने महाराष्ट्राचे ३ हवामान विभाग सांगितले आहेत.

१) उष्ण कटिबंधीय मोसमी वनांचा हवामान विभाग (AM) 

२) उष्ण कटिबंधीय शुष्क हवामान / स्टेप्स हवामान विभाग (BS)

३) उष्ण कटिबंधीय दमट-कोरडे किंवा सॅव्हाना हवामान विभाग (AW) 

तापमान कक्षा : नागपूरचे स्थान भारताच्या मध्यभागात असल्याने उन्हाळ्यात येथे दिवसाचे सरासरी तापमान ४८° सें. तर रात्रीचे सरासरी तापमान १९° सें. असते. पर्यायाने, तेथील दैनिक तापमान कक्षा २९ सें. इतकी मोठी असते.

महाराष्ट्रातील पर्जन्य

राज्यात मोसमी वाऱ्यांपासून (नैऋत्य मोसमी वारे) पाऊस पडतो. (वार्षिक सरासरी पर्जन्य : ४०० ते ६००० मि.मी.)

मोसमी पावसास ७ जूनपासून (मृग नक्षत्र) किनारी भागात सुरुवात होते. (मान्सूनचा स्फोट) . 

राज्यात सर्वाधिक पाऊस जुलै महिन्यात पडतो. 

राज्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी सुमारे २०% क्षेत्र अवर्षणग्रस्त आहे.

राज्यातील अमरावती, नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा आदी जिल्ह्यांना 'ईशान्य मोसमी वाऱ्यांपासून' पाऊस मिळतो, मात्र या वाऱ्यांपासून मिळणारा पाऊस तुलनेने कमी असतो... एप्रिल-मे महिन्यात राज्याच्या काही भागांत पावसाच्या 'आंबेसरी' पडतात. (हा पाऊस आंबा पिकास मानवतो) 

महाराष्ट्रातील पर्जन्याचे वितरण : 

१) कोकण (सर्वाधिक)

२) विदर्भ

३) मध्य महाराष्ट्र

४) मराठवाडा (सर्वात कमी)

राज्यातील मान्सूनची (पर्जन्याची) विविधता 

राज्याचा प्रदेश

पर्जन्याचे प्रमाण

वैशिष्ट्ये

कोकण किनारपट्टी

भरपूर पाऊस

२५० ते ३०० सें.मी.

- दक्षिण कोकणात रत्नागिरी येथे २४४ सें.मी. पाऊस.

- कोकणात दक्षिणेकडून उत्तरेकडे पावसाचे प्रमाण कमी होत जाते.

घाटमाथा

अति पर्जन्याचा प्रदेश

(प्रतिरोध पर्जन्य)

३०० सें.मी.हून अधिक पाऊस

- दक्षिणेकडे आंबोली (जि. सिंधुदुर्ग) येथे राज्यातील सर्वाधिक म्हणजे सुमारे ७०७ सेमी पाऊस पडतो.

- उत्तरेकडे पावसाचे प्रमाण कमी होत जाते.

सह्याद्रीच्या पूर्वेकडील भाग

पर्जन्यछायेचा प्रदेश

५० ते ७५ सें.मी. पाऊस पाऊस

- घाटमाथ्यावर महाबळेश्वर येथे ५९४ सेंमीहून अधिक; तर त्याच्या पूर्वेकडे पाचगणी (१५८ सें.मी.);

वाई (५४ सें.मी.) असे प्रमाण कमी होत जाते.

गोदावरी, भीमा कृष्णा खोरे

अवर्षणग्रस्त प्रदेश

५० सें.मी.पेक्षा कमी पाऊस

- मालेगाव (नाशिक) येथे ४४ सें.मी. पाऊस;

- दहीवडी (सातारा) येथे २९ सें.मी. पाऊस

पूर्व विदर्भ (चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा)

वाढते पर्जन्य

१५० सें.मी.

- पश्चिमेकडून पूर्वेकडे विदर्भात पाऊस वाढत जातो.

- सातपुड्याच्या रांगांचा परिणाम (प्रतिरोध पर्जन्य)

- ईशान्य मोसमी वाऱ्यांपासून पाऊस पडतो.


राज्यात आंबोली (जि. सिंधुदुर्ग) येथे सर्वाधिक (सुमारे ७०७ सें.मी.) पाऊस पडतो. 
राज्यात सर्वात कमी पाऊस सातारा जिल्ह्यातील दहीवडी व म्हसवड परिसरात (२९ ते ३० सेमी) पडतो.

ऑक्टोबर उष्मा : ऑक्टोबर हा महिना पावसाळा व हिवाळ्यादरम्यानचा 'संक्रमणाचा काळ' असतो. 
पर्यायाने राज्यात ऑक्टोबर महिन्यात विलक्षण असह्य उकाडा (October Heat) जाणवतो.

हिवाळा : ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा हिवाळ्याचा काळ असला तरी राज्यात नोव्हेंबरपासून थंडीस सुरुवात हात. समुद्रसपाटीपासून उंच जावे तसे तापमान कमी होत जाऊन हवा थंड होते. सह्याद्रीच्या उंच भागातील हवा उन्हाळ्यातदेखील थंड असते. हिवाळ्यात हवा थंड व कोरडी असते व आकाश निरभ्र असते.



Post a Comment

0 Comments