महाराष्ट्रातील दलित बांधवांची चळवळ | डॉ. बाबासाहेब आंबेडकर | महर्षी विठ्ठल रामजी शिंदे

 महाराष्ट्रातील दलित बांधवांची चळवळ 

महाराष्ट्रातील दलित चळवळ
महाराष्ट्रातील दलित चळवळ


  • जातीव्यवस्थेचा उगम उत्तर वैदिक काळातील वर्णव्यवस्थेतून झाला. वर्णव्यवस्था ही गुणांवर, तर जातीव्यवस्था जन्मावर आधारित होती. महाराष्ट्रात विविध समाजसुधारकांनी अस्पृश्यता निर्मूलन कार्यात मोलाचे योगदान दिले आहे. 
  • महात्मा फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी अस्पृश्यता निर्मूलन चळवळीतील महत्वाचे योगदान दिले आहे. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दलित चळवळीतील योगदान 

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ ही दलितांना माणूस म्हणून प्रतिष्ठा मिळवून देणारी न्यायपूर्ण चळवळ आहे. सामाजिक व आर्थिक समतेशिवाय राजकीय स्वातंत्र्याला भक्कमपणा येणार नाही या विचारातून १९२० पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीस प्रारंभ झालेला आढळतो. 
  • २५ नोव्हेंबर १९२६ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे समता सैनिक दल ही सामाजिक संघटना स्थापन केली. दलित बांधवांना गुलागिरीतून मुक्त करणे हा या संघटनेच्या स्थापनेमागील उद्देश होता. 
  • १३ मार्च १९२७ : नागपूर येथे अखिल भारतीय समता सैनिक दल या संस्थेची स्थापना. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक सुधारणा : 

  • जून १९२८ मध्ये अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी दोन वसतिगृहांची स्थापना. 
  • डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटीची स्थापना. 
  • पीपल्स एज्युकेशन सोसायटी : १९४६ 
  • १९४५ मध्ये अस्पृश्य समाजातील २० गरीब होतकरू विद्यार्थ्यांना अमेरिका व इंग्लंड येथे उच्चशिक्षणासाठी पाठविले. 
  • भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केली.

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे अस्पृश्यतानिर्मुलन कार्य 

  • वि. रा. शिंदे यांचा जन्म : २३ एप्रिल १८७३, कर्नाटकातील जमखिंडी येथे. 
  • आईचे नाव : यमुनाबाई. 
  • वि. रा. शिंदे हे प्रार्थना समाजाचे प्रचारक व कार्यकर्ते होते. महर्षी शिंदे यांनी आयुष्यभर जातिव्यवस्था नष्ट करण्यास प्राधान्य दिले. अस्पृश्योद्धाराबरोबरच स्त्रियांचे शिक्षण व शेतकऱ्यांच्या समस्या या बाबतीतही त्यांचे कार्य मोठे आहे. 
  • अस्पृश्यता निर्मुलनासाठी महर्षी शिंदे यांनी खालील प्रयत्न केले - 
  • १२ ऑक्टोबर १९०६ रोजी मुंबई येथे 'डिप्रेस्ड क्लासेस मिशन ऑफ इंडिया' ही संस्था स्थापन केली.
  • १२ ऑक्टोबर १९०६ रोजीच एल्फिन्स्टन रोड येथे पहिली शाळा सुरू केली. 
  • ठाणे, मालवण, अमरावती, अकोला या शहरांत शाळा व वसतिगृहे सुरू केली. 
  • १९१२ मध्ये पुण्यात फर्ग्युसन कॉलेजमध्ये अस्पृश्य व ब्राह्मण यांच्या एकत्र सहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला. 
  • १९१७ मध्ये मुंबई येथे नारायण गणेश चंदावरकर यांच्या अध्यक्षतेखाली भरविलेल्या सभेत महर्षी शिंदे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानपत्र देण्यात यावे, अशी मागणी केली. 
  • १९१७ च्या कोलकाता येथील काँग्रेस अधिवेशनात महर्षी शिंदे यांनी अस्पृश्यताविरोधी ठराव मांडला. 
  • दादोबा पांडुरंग तर्खडकर : मानवधर्म सभा व परमहंस सभा यांच्या माध्यमातून जातिव्यवस्थेस विरोध केला. 
  • लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख : यांनी गुणकर्माधिष्ठित सामाजिक व्यवस्थेचा पुरस्कार केला.




Post a Comment

0 Comments