महाराष्ट्रातील राष्ट्रवादाचा उदय | राष्ट्रीय सभेची महाराष्ट्रात संपन्न झालेली अधिवेशने | राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशने

 महाराष्ट्रातील राष्ट्रवादाचा उदय 

राष्ट्रीय-काँग्रेस-अधिवेशने
राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशने


महाराष्ट्रातील राष्ट्रवादाच्या उदयाची कारणे - 

१) ऐतिहासिक वारसा : छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य, लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेले शिवजयंती व गणेशोत्सव इत्यादी बाबींमुळे राष्ट्रवादास उत्तेजन मिळाले. 

२) ब्रिटिशांनी केलेले आर्थिक शोषण.

३) पाश्चात्य संस्कृती व पाश्चात्य भाषेचा प्रभाव : ब्रिटिशांनी भारतात इंग्रजी शिक्षण सुरू केल्यामुळे भारतातील विविध प्रांतातील लोक एकमेकांच्या संपर्कात आले. 

४) दळणवळणातील क्रांती : रेल्वे, पोस्ट, तारायंत्रे इत्यादी सुविधांमुळे देशातील विविध प्रांतातील लोक एकमेकांच्या संपर्कात आले.

५) मध्यमवर्गाचा उदय : इंग्रजी शिक्षणामुळे डॉक्टर, वकील, शिक्षक, पत्रकार, साहित्यिक यासारखा सुशिक्षित मध्यमवर्ग पुढे येऊन त्यांनी राष्ट्रवादाच्या भावनेस व्यापक स्वरूप प्राप्त करून दिले.

६) प्रसारमाध्यमांमुळे लोकजागृती : प्रबोधन काळात विविध वृत्तपत्रे व साहित्य यामुळे लोकांमध्ये जागृती होऊन राष्ट्रवादी भावना वाढीस लागली. 

७) १८५७ चा उठाव : १८५७ चा उठाव जरी अयशस्वी झाला तरी ब्रिटिशांच्या ‘फोडा व झोडा' या नीतिमुळे संपूर्ण भारतात राष्ट्रवादाची भावना वाढीस लागली.

महाराष्ट्रातील राष्ट्रवादी संघटना 

राष्ट्रवादाच्या अमूर्त भावनेला प्रेरणा देणाऱ्या महाराष्ट्रातील राष्ट्रवादी संघटना पुढीलप्रमाणे -

मुंबई इलाख्यातील राष्ट्रवादी संस्था 

१) बॉम्बे असोसिएशन : 

  • स्थापना : २६ ऑगस्ट १८५२ 
  • संस्थापक : नौरोजी फरदूनजी, जगन्नाथ शंकरसेठ.
  • नाना जगन्नाथ शंकरसेठ यांनी मुंबईतील मोठ्या व्यापाऱ्यांच्या सहकार्याने ही संस्था स्थापन केली.
  • हेतू : सनदशीर मार्गाने जनतेचे प्रश्न सोडविणे. 
  • बॉम्बे असोसिएशन ही मुंबई प्रांतातील (महाराष्ट्रातील) पहिली राजकीय संघटना आहे. 

२) ईस्ट इंडिया असोसिएशन, १८६९ : 

  • दादाभाई नौरोजी यांनी १८६६ मध्ये लंडन येथे 'ईस्ट इंडिया असोसिएशन' ही संघटना स्थापन केली होती. 
  • १८६९ मध्ये या संघटनेची शाखा मुंबई येथे स्थापन. 

३) बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन, १८८५ : 

  • संस्थापक : फिरोजशहा मेहता, बद्रुद्दीन तय्यबजी, न्या. के. टी. तेलंग (हे त्रिकूट 'ब्रदर्स-इन-लॉ म्हणून प्रसिद्ध) 
  • इंग्लंडमधील जनमत भारतीयांबाबत जागृत करण्याचा प्रयत्न या संस्थेने केला. 
  • वरील सर्व संघटना या प्रादेशिक स्तरावर स्थापन झाल्या होत्या. 

४) राष्ट्रीय सभा (राष्ट्रीय काँग्रेस) : 

  • २८ डिसेंबर १८८५ रोजी अखिल भारतीय स्तरावर राष्ट्रीय सभेची स्थापना झाली. 
  • राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन : २८ डिसेंबर १८८५ रोजी मुंबई येथे गोकुळदास तेजपाल संस्कृत महाविद्यालयाच्या सभागृहात ७२ सदस्यांच्या उपस्थितीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन पार पडले. 
  • राष्ट्रीय सभा तथा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस म्हणजेच आजचा राष्ट्रीय काँग्रेस पक्ष होय.

राष्ट्रीय सभेची महाराष्ट्रात संपन्न झालेली अधिवेशने :

वर्ष

ठिकाण

अध्यक्ष

१८८५

मुंबई

व्योमेशचंद्र बॅनर्जी

१८८९

मुंबई

सर विल्यम वेडरबर्न

१८९१

नागपूर

पी. आनंदा चार्लू

१८९५

पुणे

सुरेंद्रनाथ बॅनर्जी

१८९७

अमरावती

सी. शंकरन नायर

१९०४

मुंबई

सर हेनरी कॉटन

१९१५

मुंबई

सत्येंद्र प्रसन्न सिन्हा

१९१८

मुंबई

बॅ. सय्यद हसन इमाम

१९२०

नागपूर

चक्रवर्ती विजय राघवाचार्य

१९३४

मुंबई

डॉ. राजेंद्र प्रसाद

१९३६

फैजपूर

पं. जवाहरलाल नेहरू

१९४२

मुंबई

मौलाना  आझाद

१९५०

नाशिक

पुरुषोत्तमदास टंडन

१९५९

नागपूर

यु. एन. ढेबर

१९८३

मुंबई

इंदिरा गांधी

१९८५

मुंबई

राजीव गांधी



Post a Comment

0 Comments