घटना समिती | प्रमुख उपसमित्या | अध्यक्ष व सदस्य संपूर्ण माहिती

  घटना समितीच्या काही प्रमुख उपसमित्या व त्यांचे अध्यक्ष


मसुदा समिती - डॉ. बाबासाहेब आंबेडकर  

संघराज्य घटना समिती - पं. जवाहरलाल नेहरू 

संघराज्य अधिकार समिती - पं. जवाहरलाल नेहरू 

प्रांतिय राज्यघटना समिती - सरदार वल्लभभाई पटेल 

राष्ट्रध्वजासंबंधी समिती - डॉ. राजेंद्र प्रसाद 

अर्थ व स्टाफ समिती - डॉ. राजेंद्र प्रसाद

मसुदा राज्यघटना चिकित्सा समिती - सर अलादी कृष्णस्वामी अय्यर 

अधिकारपत्र समिती - सर अलादी कृष्णस्वामी अय्यर 

राज्यघटना समितीचे कार्य - ग. वा. मावळणकर 

गृह समिती - डॉ. बी. पट्टाभिसीतारामय्या 

भाषिक प्रातांवरील समिती - के. एम. मुन्शी 

सुकाणू समिती - के. एम. मुन्शी 

मूलभूत हक्क व अल्पसंख्यांक सल्लागार समिती - सरदार वल्लभभाई पटेल

मूलभूत हक्क व अल्पसंख्यांक सल्लागार समिती : 

या समितीच्या पुढील उपसमित्या होत्या. 

१) मूलभूत हक्क विषयक उपसमिती - जे. बी. कृपलानी 

२) अल्पसंख्यांक विषयक उपसमिती - एच. सी. मुखर्जी 

३) ईशान्येकडील व आसाममधील काही जनजाती क्षेत्रे उपसमिती - गोपीनाथ बार्डोलोई 

४) आसाम व अन्य क्षेत्रातील वगळलेल्या क्षेत्रांसाठी उपसमिती - ए. व्ही. ठक्कर

मसुदा समितीची रचना : १ अध्यक्ष + ६ सदस्य. 

मसुदा समितीचे अध्यक्ष : डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

  • २९ ऑगस्ट १९४७ : घटनेच्या मसुदा समितीच्या अध्यक्षपदी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची निवड झाली. 

मसुदा समितीचे ६ सदस्य : अलादी कृष्णस्वामी अय्यर, कन्हैय्यालाल माणेकलाल (के. एम.) मुन्शी, एन गोपालस्वामी अय्यंगार, सय्यद मोहम्मद सादुल्ला, डी. पी. खेतान, बी. एल. मित्तर. 

  • बी. एल. मित्तर यांच्या राजीनाम्यानंतर एन. माधवराव हे मसुदा समितीचे सदस्य बनले. .डी. पी. खेतान यांच्या निधनानंतर टी. टी. कृष्णम्माचारी हे मसुदा समितीचे सदस्य बनले.
  • एन. जी. अय्यंगार हे काश्मीरचे राजा हरिसिंग यांचे दिवाण होते. त्यांनी काश्मीरविषयक कलम ३७० चा मसुदा तयार केला.
  • मसुदा समितीचे कामकाज २९ ऑगस्ट १९४७ ते २६ नोव्हेंबर १९४९ या काळात चालले. मसुदा समितीने अवघ्या १४१ दिवसांत संविधानाचा मसुदा बनविला. 
  • 'घटना समितीचे कामकाज एकूण १०८२ दिवस (२ वर्षे, ११ महिने, १८ दिवस) इतका प्रदीर्घ काळ चालले. घटना समितीचे प्रत्यक्ष कामकाज एकूण १६५ दिवस चालले. 
  • १३ डिसेंबर १९४६ : पं. जवाहरलाल नेहरू यांनी राज्यघटनेच्या उद्दीष्टांचा ठराव मांडला. त्यालाच Preamble म्हणतात. 
  • २२ जानेवारी १९४७ : पं. जवाहरलाल नेहरूंनी मांडलेला घटना समितीच्या उद्दिष्टांबाबतचा ठराव मंजूर झाला.

संविधान सभेचे तीन टप्पे व स्वरूप :


टप्पा

कालावधी

स्वरुप

पहिला टप्पा

६ डिसेंबर १९४६ ते १४ ऑगस्ट १९४७

त्रिमंत्री योजनेच्या अखत्यारितील संविधान सभा

दुसरा टप्पा

१५ ऑगस्ट १९४७ ते २६ नोव्हेंबर १९४९

सार्वभौम संविधान सभा व हंगामी संसद तिसरा टप्पा २७ नोव्हेंबर १९४९ ते मार्च १९५२ हंगामी संसद

तिसरा टप्पा

२७ नोव्हेंबर १९४९ ते मार्च १९५२

हंगामी संसद

  • मार्च १९५२ मध्ये लोकसभेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका होऊन भारतीय संसद अस्तित्वात आली.



Post a Comment

0 Comments